Thursday, August 6, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०३

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०३

एका व्यापाऱ्याने ७० रुपये किलो किमतीच्या २० किलो तांदळाच्या गोणीमध्ये ५५ रुपये किलो किमतीचे तांदूळ मिसळले आणि ते तांदूळ ७२ रुपये किलोने विकून २०% नफा कमावला. तर त्याने ५५ रुपये किलोचे किती किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते?

➡️ उत्तर :- 

५५ रुपये किलोचे x किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते असे मानू.

➡️ म्हणून,

x किलो तांदळाची खरेदी किंमत = ₹ ५५x
२० किलो तांदळाची खरेदी किंमत = २० × ७० = ₹ १४००

➡️ ५५ रुपये किलोचे x किलो तांदूळ त्या गोणीत मिसळल्यानंतर 

१ किलो तांदळाची खरेदी किंमत = (५५x + १४००) / (x + २०)...(i)

गोणीतील तांदूळ ७२ रुपये किलोने विकून २०% नफा मिळवला आहे.

आपल्याला माहिती आहे की,

नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत 

         आणि 

शेकडा नफा = १०० × नफा / खरेदी किंमत 

२० = १००( विक्री किंमत - खरेदी किंमत) / खरेदी किंमत 

२० × खरेदी किंमत = १००(७२ - खरेदी किंमत)

२० × खरेदी किंमत = ७२०० - १०० × खरेदी किंमत

२० × खरेदी किंमत + १०० × खरेदी किंमत = ७२००

१२० × खरेदी किंमत = ७२००

खरेदी किंमत = ७२००/१२०


➡️ म्हणून,


१ किलो तांदळाची किंमत = ₹ ६०.....(ii)

➡️ समीकरण (i) व (ii) वरून

६० = (५५x + १४००)/ (x + २०) 
६०(x + २०) = (५५x + १४००)
६०x + १२०० = ५५x + १४००
६०x - ५५x = १४०० - १२००
५x = २००
x = २००/५
x = ४०
➡️ म्हणून ५५ रुपये किलोचे ४० किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते.



© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी








No comments:

Post a Comment