Friday, November 29, 2019

गणिताशी गट्टी क्र.३२

✍️ गणिताशी गट्टी क्र.३२

शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती परिषदेनिमित्त विद्यार्थ्यांच्या वाचनाची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता  सर्व्हेक्षण कमी चाचपणी करण्यात आली. यामध्ये विविध भागातील २४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्या चाचपणीतील विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त वेळेत काय करायला आवडते? या प्रश्नास मिळालेले प्रतिसाद पुढील प्रमाणे आहेत.
१) १८२ जणांना वाचनाची, ७३ जणांना खेळाची तर ७७ जणांना टीव्ही पाहण्याची आवड आहे.
२) ५० विद्यार्थ्यांना वाचन व खेळ दोन्ही आवडतात , ५५ विद्यार्थ्यांना वाचन व टीव्ही पाहण्यास आवडते तर १७ विद्यार्थ्यांना खेळ व टीव्ही या दोन्हींची आवड आहे.
३) फक्त ७ विद्यार्थ्यांना वरील तिन्हींचीही आवड आहे.
तर किती विद्यार्थ्यांना वरीलपैकी एकही गोष्ट आवडत नाही?


A हा वाचन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे 
B हा खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे तर
C हा टीव्ही पाहायला आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे असे मानू.

➡️ म्हणून

n(A) = १८२
n(B) = ७३
n(C) = ७७

➡️ तसेच

n( A ∩ B ) = ५०
n( B ∩ C ) = १७
n( A ∩ C ) = ५५

➡️ ७ विद्यार्थ्यांना वाचन, खेळ आणि टीव्ही पाहण्याची आवड आहे.
म्हणून 

n( A ∩ B ∩ C ) = ७

➡️ आपल्याला माहिती आहे की,

n ( A ∪ B ∪ C ) 
= n(A) + n(B) + n(C) + n( A ∩ B ∩ C )
- [n( A ∩ B ) + n( B ∩ C )+ n( A ∩ C )] 
= १८२ + ७३ + ७७ + ७ - [ ५० + १७ + ५५ ] 
= ३३९ - १२२
= २१७

➡️ म्हणून २१७ विद्यार्थ्यांना वरील तीन पैकी कमीतकमी एक गोष्ट तरी आवडते.

➡️ वाचन , खेळ किंवा टीव्ही पाहणे यापैकी एकही गोष्ट न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 
= २४२ - २१७
= २५

➡️ म्हणून २५ विद्यार्थ्यांना वाचन, खेळ किंवा टीव्ही पाहणे यापैकी कशाचीही आवड नाही.

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Thursday, November 28, 2019

गणिताशी गट्टी क्र.३१

✍️गणिताशी गट्टी क्र.३१

शालेय शिक्षण आणि वाचन संस्कृती परिषद रंगस्वर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. एका रांगेत जेवढी आसने होती त्याच्या दोन पंचमांश ( २/५ ) रांगा होत्या. प्रत्येक रांगेतील आसनांची संख्या  एकूण रांगांच्या दुपटीपेक्षा ५ ने जास्त आहे. सभागृहातील एकही आसन रिक्त नसेल तर परिषदेसाठी किती प्रतिनिधी उपस्थित होते?


➡️ एका रांगेतील आसनांची संख्या x तर एकूण रांगा y आहेत असे मानू.

पहिल्या अटीवरून,

y = (२/५) x
२x = ५y
२x - ५y = ० ......(i)

दुसऱ्या अटीवरून,

x = २y + ५ .......(ii)

➡️ x = २y + ५ ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून

२(२y + ५) - ५y = ०
४y + १० - ५y = ०
४y - ५y = -१०
-y = -१०
y = १०

➡️ y = १० ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून

x = २(१०) + ५
x = २० + ५
x = २५

➡️ म्हणून, परिषदेला उपस्थित एकूण प्रतिनिधी

= xy
= २५ × १०
= २५०

➡️ म्हणून शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती परिषदेसाठी रंगस्वर सभागृहात एकूण २५० प्रतिनिधी उपस्थित होते.

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, November 22, 2019

गणिताशी गट्टी क्र.३०

✍️गणिताशी गट्टी क्र.३०

डिस्काऊंट द्या या ग्राहकांच्या मागणीने बेजार झालेल्या सर्वोदय साडीच्या दुकानदाराने साडीची किंमत २५% ने वाढवली आणि  ग्राहकांना २०% डिस्काऊंट देऊन साडी विकण्यास सुरुवात केली तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा होईल?

➡️ साडीची विक्री किंमत ₹ १०० होती असे मानू.

साडीची वाढवलेली किंमत = ₹ १२५.
डिस्काऊंट = २०%
एकूण डिस्काऊंट 
= १२५ चे २०%
= १२५ × २०/१००
= ₹ २५.

➡️ डिस्काऊंट दिल्यानंतर साडीची विक्री किंमत

= १२५ - २५ 
= ₹ १००
म्हणून नफा 
= १०० - १००
= ०

➡️ म्हणून या व्यवहारात त्यांना ०% नफा होईल.

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, November 20, 2019

गणिताशी गट्टी क्र.२९

✍️ गणिताशी गट्टी क्र.२९

✍️ विकास आपल्या पगाराच्या १०% रक्कम घरभाडयासाठी देतो तर उर्वरित रक्कमेच्या १५% रक्कम मुले शिकत असलेल्या सरकारी शाळेला देणगी म्हणून देतो.  उरलेल्या रक्कमेच्या १०% रक्कम पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात गुंतवतो. नंतर १०००० हजार रुपये स्वतःच्या आकस्मिक गरज निधी खात्यात जमा करून तसेच ५००० रुपये स्वखर्चासाठी ठेवून राहिलेले २६३१० रुपये आपल्या पत्नीकडे घरखर्चासाठी देतो तर विकासचा पगार किती आहे?

➡️ विकासचा पगार ₹x आहे असे मानू.

घरभाडे = १०% x
घरभाडे = (१०/१००) x
घरभाडे = (१/१०) x
घरभाडे देऊन उरलेली रक्कम 
= x - (१/१०) x
= (१०x - १x )/ १०
= ९x/१० रुपये

➡️ सरकारी शाळेला देणगी दिलेली रक्कम

= १५% ९x/१० 
= (१५/१००) (९x/१०)
= २७x/२०० रुपये

➡️ देणगी देऊन उरलेला पगार 

= (९x/१०) - (२७x/२००)
= (१८०x/२००) - (२७x/२००)
= १५३x / २००

➡️ पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात जमा केलेली रक्कम

= १०% (१५३x/२००)
= १५३x/२००० रुपये

➡️ प्रॉव्हिडंड फंड जमा करून उरलेली रक्कम 

= (१५३x/२००) - (१५३x/२०००)
= (१५३०x/२०००) - (१५३x/२०००)
= १३७७x/२००० रुपये.

➡️ दिलेल्या अटीवरून,

१३७७x/२००० = १००००+५०००+२६३१०
१३७७x/२००० = ४१३१०
x = ४१३१०×२०००/१३७७
x = ६०००० रुपये.

➡️ म्हणून विकासचा पगार ६०,००० रुपये

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, November 15, 2019

गणिताशी गट्टी-२८

,✍️ गणिताशी गट्टी-२८

✍️ संत एकनाथ वसतिगृहात एकूण ४८ विद्यार्थी होते. परंतु नवीन आठ प्रवेश झाल्यामुळे दररोजचा खानावळीचा खर्च २४० रुपयांनी वाढला मात्र दरडोई सरासरी खर्च १० रुपयांनी कमी झाला. तर सुरुवातीस एका दिवसाचा खानावळीचा सरासरी खर्च किती होता?

➡️ सुरुवातीला दररोजचा दरडोई खर्च ₹x होता असे मानू.

म्हणून दररोजचा एकूण खर्च = ₹ ४८x
आठ नवीन विद्यार्थी आल्यामुळे दरडोई खर्च १० रुपयांनी कमी झाला.

➡️ म्हणून आता दररोजचा एकुण खर्च 
= ५६(x-१०)
= ५६x - ५६० रुपये.

➡️ दिलेल्या अटीवरून,
५६x - ५६० - ४८x = २४०
८x = २४० + ५६०
८x = ८००
x = ८००/८
x = १००

➡️ सुरुवातीस सरासरी खर्च
=४८x
= ४८ × १००
= ४८०० रुपये.

➡️ म्हणून सुरुवातीस एक दिवसाचा खानावळीचा सरासरी खर्च ४८०० रुपये होता.

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, November 13, 2019

गणिताशी गट्टी क्र.२७

✍️गणिताशी गट्टी क्र.२७

✍️ रविवारी दहावी जादा तासिकेचा वर्ग सकाळी आठ वाजता सुरू झाला आणि सकाळी ११:५५ वाजता संपला. या कालावधीत एकूण चार तासिका झाल्या. प्रत्येक तासिकेनंतर विद्यार्थ्यांना ५ मिनिटांची सुट्टी दिली गेली  तर एक तासिका किती मिनिटांची होती?

➡️ एक तासिका x मिनिटांची होती असे मानू.

वर्ग सकाळी आठ वाजता सुरू होऊन सकाळी ११:५५ वाजता संपला.

➡️ म्हणून वर्ग कालावधी
 = ११:५५ - ८:००
 = ३ तास ५५ मिनिटे
 = ३× ६० मिनिटे + ५५ मिनिटे
 = १८० मिनिटे + ५५ मिनिटे
 = २३५ मिनिटे.
➡️ प्रत्येक तासिकेनंतर ५ मिनिटांची सुट्टी होती.
म्हणून सुट्टीचा कालावधी 
=३ × ५
= १५ मिनिटे

➡️ दिलेल्या अटीवरून,

४x + १५ = २३५
४x = २३५ - १५
४x = २२०
x = २२०/४
x = ५५ मिनिटे

➡️ म्हणून एक तासिका ५५ मिनिटांची होती.

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, November 8, 2019

गणिताशी गट्टी क्र.-२६

✍️गणिताशी गट्टी क्र.-२६

✍️ इयत्ता ९ वीमधील ५४ स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई अंतर्गत निधी गोळा करण्याचे ठरवले. स्काऊट (मुलगा) च्या प्रत्येक विद्यार्थ्याने गाईड(मुली) च्या एकूण संख्येइतका निधी गोळा करण्याचा संकल्प केला. तर गाईडच्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्काऊटच्या एकूण संख्येच्या दीडपट निधी गोळा करण्याचा निर्धार केला. अशा प्रकारे त्यांनी एकूण १७०० रुपयांचा निधी गोळा केला तर त्या वर्गात असलेल्या स्काऊटची संख्या किती?

➡️ स्काऊटचे विद्यार्थी x तर गाईडचे y मानू.

पहिल्या अटीवरून,

x + y = ५४ 
x = ५४ - y ........(i)

दुसऱ्या अटीवरून,

xy + ३/२ xy = १७००

२xy + ३xy / २ = १७००
५xy = १७०० × २
५xy = ३४००
(५४-y)y = ३४००/५
५४y - y^२ = ६८०

➡️ म्हणून

y^२ - ५४y + ६८० = ०
y^२ - ३४y - २०y + ६८० = ०
y(y - ३४) - २०(y - ३४) = ०
(y - ३४) (y-२०) = ०
म्हणून y - ३४ = ० किंवा y - २० = ०
y = ३४ किंवा y = २०

➡️ म्हणून गाईडची संख्या २० असताना
स्काऊटची संख्या 
= ५४ - २०
= ३४
आणि
 गाईडची संख्या ३४ असताना
स्काऊटची संख्या 
= ५४ - ३४
= २०
➡️ म्हणून स्काऊटची संख्या २० किंवा ३४ असेल.

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, November 6, 2019

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. २५

✍️एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व म्हशी आहेत तसेच जितके बैल आहेत त्याच्या दुप्पट गायी आहेत. बैलांची संख्या म्हशींच्या संख्येपेक्षा एकने जास्त आहे. जर पाळीव पशूं (कोंबड्यासहित) च्या पायांची संख्या पाळीव प्राण्यांच्या (कोंबड्यासहित ) एकूण संख्येच्या दुपटीपेक्षा ३० ने जास्त असेल तर त्या शेतकऱ्याकडे किती गायी आहेत? (टीप : एकही प्राणी पायाने अधू नाही. )

➡️ बैलांची संख्या x तर कोंबड्याची संख्या y मानू.

म्हणून गायींची संख्या = २x
म्हशींची संख्या = x - १

➡️ दिलेल्या अटीवरून,

४x + ४(x-१) + ४(२x) + २y = २(x + x-१ + २x + y ) + ३०
४x + ४x - ४ + ८x + २y = २( ४x + y - १) + ३०
१६x + २y - ४ = ८x + २y - २ +३०
१६x - ८x = २८ + ४
८x = ३२
x = ३२/८

➡️ x = ४

म्हणून गायींची संख्या
 = २x
 = २ × ४
 = ८

➡️ म्हणून त्या शेतकऱ्याकडे ८ गायी आहेत.

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, November 1, 2019

गणिताशी गट्टी क्र-२४

✍️गणिताशी गट्टी क्र-२४

गोपालदास गवळी ज्या किमतीला दूध खरेदी करतो त्याच किमतीला विकत असल्याचा दावा करत होता. त्याला विश्वासात घेऊन विचारले असता  दुधात पाणी मिसळून ३०% नफा कमवत असल्याचे त्याने कबूल केले. तर तो विकत असलेल्या  दुधात ( मिश्रणात) शुद्ध दूध किती टक्के होते?


➡️ गोपालदास १०० रुपयाला १ लिटर दूध घेतो असे मानू.
खरेदी किंमत व विक्री किंमत समान असली तरी पाणी मिसळून ३०% नफा तो कमवत आहे.

तो दुधात x लिटर पाणी मिसळतो असे मानू.

म्हणून विक्रीसाठी उपलब्ध दूध (मिश्रण ) = (१+x) लिटर 
म्हणून एकूण विक्री किंमत = १००(१+x) रुपये 
नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत 
नफा = १००(१+x) - १००
नफा = १०० + १००x - १००
नफा = १००x

➡️ शेकडा नफा = (नफा/खरेदी किंमत )१००

 ३० = (१००x/१००)१००
 ३० = १००x
 x = ३०/१००
 x = ३/१० लिटर

➡️ म्हणून १ लिटर दुधात गोपालदास ३/१० लिटर पाणी मिसळतो.

म्हणून मिश्रणातील दूध व पाणी यांचे प्रमाण 
= १ : ३/१०
= १० : ३

➡️म्हणून मिश्रणातील दुधाची टक्केवारी

= (१०/१३) १००
= १०००/१३
= ७६.९२

➡️म्हणून गोपालदास विकत असलेल्या दुधात ( मिश्रणात ) शुद्ध दूध  ७६.९२% आहे.

©अजित तिजोरे-८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी