Friday, February 7, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५२

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.५२

एका क्रिकेट सामन्यात अभिजित ने चंदनच्या दुप्पट धावा केल्या. चंदन आणि अमोल यांच्या धावांचे प्रमाण २:३ आहे. जर तिघांनी मिळून त्या सामन्यात २७० धावा काढल्या तर चंदनने किती धावा केल्या?

➡️उत्तर :- 

अभिजित आणि चंदन यांच्या धावांचे प्रमाण = २:१......(i)
चंदन आणि अमोल यांच्या धावांचे प्रमाण = २:३ .......(ii)
अभिजित आणि चंदन यांच्या धावांचे प्रमाण = ४:२......(iii) ...(i वरून)

➡️ समीकरण (ii) आणि (iii) वरून,

अभिजित , चंदन आणि अमोल यांच्या धावांचे प्रमाण = ४:२:३
समानपट x मानू.

➡️ म्हणून,

अभिजितच्या धावा = ४x
चंदनच्या धावा = २x
अमोलच्या धावा = ३x

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

४x + २x + ३x = २७०
९x = २७०
x = २७०/९
x = ३०..........(iv)

➡️म्हणून,

चंदनच्या धावा = २x
                     = २ × ३० .........(iv वरून)
                     = ६०
म्हणून चंदनने त्या क्रिकेट सामन्यात ६० धावा केल्या.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

No comments:

Post a Comment