Wednesday, October 9, 2019

गणिताशी गट्टी क्र-१७

✍️गणिताशी गट्टी क्र-१७

✍️सोहन, मोहन , रोहन यांच्या वजनाची सरासरी ८४ किलो आहे. तर सोहन, मोहन , रोहन आणि राजन यांच्या वजनाची सरासरी ८० किलो आहे. राजनपेक्षा तीन किलो वजन जास्त असलेल्या राघवने सोहनची जागा घेतली तर त्या चौघांच्या ( राजन, राघव, मोहन, रोहन ) वजनाची सरासरी ७९ किलो होते. तर सोहनचे वजन किती किलो आहे?

➡️सोहनचे वजन x किलो , मोहनचे वजन y किलो , रोहनचे वजन z किलो , राजनचे वजन m किलो तर राघवचे वजन n किलो मानू.

➡️पहिल्या अटीवरून,

(x+y+z) / ३ = ८४
x+y+z = ८४×३
x+y+z = २५२ ........(i)

➡️दुसऱ्या अटीवरून,

(m+x+y+z)/४ = ८०
m+x+y+z = ८०×४
m + २५२ = ३२० .....( i वरून )
m = ३२० - २५२
m = ६८ किलो.

म्हणून राजन चे वजन ६८ किलो आहे.
राघवचे वजन राजन पेक्षा ३ किलोने जास्त आहे.
म्हणून राघवचे वजन = m = ६८+३ = ७१ किलो.

➡️तिसऱ्या अटीवरून,

(m+n+y+z)/४ = ७९
६८+७१+y+z = ७९×४
१३९ +y+z = ३१६
y+z = ३१६ - १३९
y+ z = १७७ .......( ii )

➡️म्हणून

x+१७७ = २५२ .....( i व ii वरून)
x = २५२ - १७७
x = ७५ किलो

म्हणून सोहनचे वजन ७५ किलो आहे.

©अजित तिजोरे-८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

No comments:

Post a Comment